Voice of Eastern

मुंबई :

महापालिकेने जाहीर केलेल्या प्रभाग पुनर्रचनेवर भाजपकडून जोरदार टीका झाली असताना २३६ प्रभागांसाठी फक्त १०० हरकती व सूचना दाखल झाल्या आहेत. या हरकती व सूचनांवर निवडणूक आयोगाकडून नियुक्त केलेल्या समितीसमोर २२ फेब्रुवारीपासून सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर त्यासंदर्भातील अहवाल २ मार्चला निवडणूक आयोगाला सादर केला जाणार आहे.

मुंबईमध्ये लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे महापालिकेकडून करण्यात आलेल्या पुनर्रचनेनुसार मुंबईमध्ये ९ प्रभागांची वाढ झाली आहे. त्यामुळे प्रभाग संख्या २२७ वरून २३६ वर पोहोचली आहे. नव्या प्रभाग रचनेचा मसुदा महापालिकेच्या संकेतस्थळावर १ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यावर पालिकेकडून १४ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्यानुसार राजकीय कार्यकर्ते, माजी नगरसेवक आणि विविध सामाजिक संस्था यांच्याकडून १०० हरकती व सूचना आल्या आहेत. विशेष म्हणजे या प्रभाग रचनेला भाजपकडून विरोध करण्यात आला होता. आम्ही प्रभाग रचनेविरोधात हरकती व सूचना मांडणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत होते. त्या तुलनेत हरकती व सूचना फार कमी आल्याचे दिसून येत आहे.

काहीजणांनी प्रभागात केलेले बदल पूर्ववत करावेत. प्रभागातील काही भाग वगळण्यात यावा. मर्जीतील मतदार असलेला भाग तसाच ठेवावा अशाप्रकारे हरकती व सूचना केल्याचे समजते. हरकती व सूचनावर सुनावणीसाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव, कोंकण विभागीय आयुक्त, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त यांची समिती नियुक्त केली आहे

Related posts

‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानातून सव्वा कोटी महिलांची आरोग्य तपासणी

केईएमपाठोपाठ शीव, नायर रुग्णालयामध्येही होणार वंधत्त्वावर उपचार; लवकरच सुरू होणार आयव्हीएफ केंद्र

म्युझिकल ‘सर्जा’ चित्रपटाचे पोस्टर लाँच

Leave a Comment