Voice of Eastern

विक्रोळी :

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे समुह क्रमांक ७, रमाकांत देशमुख मार्ग, टागोर नगर येथे  ६०० मी.मी. व्यासाच्या जलवाहिनीच्या गलती दुरूस्तीचे काम २४ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वाजेपासून २५ मार्च २०२२ रोजी पहाटे ३ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत म्हणजे २४ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वाजेपासून शुक्रवार, दिनांक २५ मार्च २०२२ रोजी पहाटे ३  वाजेपर्यंत एस विभागांमधील प्रभाग क्रमांक ११७, ११८, ११९ परिसरात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

या कालावधीतील पाणीकपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

Related posts

थायमोमासह मायस्थेनिया ग्रॅव्हिस या दुर्मिळ आजाराचा सामना करणाऱ्या २८ वर्षीय रुग्णाला मिळाले नवे जीवन 

आयडॉलच्या प्रवेशास ३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Voice of Eastern

परिचारिकांना न्याय मिळवून देण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा- अनिल गलगली

Leave a Comment