शहर

घाटकोपर दरड प्रकरण : खासदार संजय पाटील आक्रमक; प्रशासन कधी जागे होणार

मुंबई : 

घाटकोपर येथील कातोडीपाडा या ठिकाणी काजरोळकर सोसायटीवर दरड कोसळली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अशा घटना ऐन पावसाळ्यातच होत असतात, या घटना होऊ नये म्हणुन ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी प्रशासनाला वारंवार पत्र लिहले असून प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या सर्व बैठकांमध्ये हा मुद्दा प्रामुख्याने मांडला. अनेक ठिकाणी संरक्षण भिंत नसल्याने या घटना वारंवार घडत असल्याचे त्यांनी सांगितले.

नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या समक्ष खासदार संजय दिना पाटील यांनी घाटकोपर ते मुलुंड या भागात दरडी कोसळत असून प्रत्येक वर्षी अनेकांचे जीव जात असल्याचे सांगितले होते. याबाबत लेखी तक्रार देऊन ही यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. तसेच पालिका प्रशासनाच्या प्रत्येक बैठकीत हा मुद्दा वारंवार मांडला जातो. मात्र त्याकडे पालिका अधिकारी जाणीवपुर्वक दुर्लक्ष करतात, अशी टीकाही संजय पाटील यांनी यावेळी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *