मुख्य बातम्याशहर

Water storage:धरणातील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत समाधानकारक

संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन नियोजन करा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

मुंबई :
राज्यातील धरणातील पाणी साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला असला तरीही संभाव्य (Water storage) परिस्थिती लक्षात घेऊन योग्य नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिल्या. राज्यातील धरणातील पाणी साठा आणि पाणी पुरवठा याबाबतचे सादरीकरण जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील धरणातील पाणी साठा अद्यापही समाधानकारक आहे. पाणी टंचाई जाणवत असलेल्या गावांमध्ये टॅंकरने पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत अद्याप खूप चांगली परिस्थिती आहे. कारण गेल्या वर्षी याच तारखेला राज्यात २५६४ टॅंकर सुरू होते. मात्र सध्या ७९६ टॅंकर सुरू आहेत. बीड जिल्ह्यात गेल्या वर्षी २६३ टॅंकर सुरू होते. मात्र सध्या अद्याप एकही टॅंकर सुरू नाही. मात्र तरीही संभाव्य परिस्थिती गृहीत धरून पाणी पुरवठा बाबतचे नियोजन करावे.

राज्यात १८ जिल्ह्यात ७९६ टॅंकरने पाणी पुरवठा

राज्यातील अठरा जिल्ह्यातील ६४४ गावे आणि २०५१ वाड्यात ७९६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज देण्यात आली. राज्यातील धरणातील पाणी साठा आणि पाणी पुरवठा याबाबतचा आढावा घेण्यात आला. राज्यात सद्यस्थितीत ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापुर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, अमरावती, वाशिम, बुलढाणा व यवतमाळ या १८ जिल्ह्यात शेवटचा पर्याय म्हणून टँकरने ६४४ गाव आणि २०५१ वाड्यांमध्ये एकूण ७९६ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक टॅंकरने पाणी पुरवठा

राज्यातील छत्रपती संभाजीनगर महसुली विभागात सर्वाधिक म्हणजेच, एकूण २७५ टॅंकरने पाणी पुरवठा सुरू आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सर्वाधिक, १९२ टॅंकरने पाणी पुरवठा सुरू आहे. मागील वर्षी याच कालावधीत २०२६ गावे व ४९७२ वाड्यांमध्ये एकूण २५६४ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता, अशी माहिती देण्यात आली.

महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर

 

राज्यातील एकूण पाणीसाठा

मोठी धरणे: 10,401 दशलक्ष घन मीटर
मध्यम धरणे: 2572 दशलक्ष घन मीटर
लघु धरणे: 2101 दशलक्ष घन मीटर

राज्यातील प्रमुख धरणातील उपयुक्त पाणी साठा

धरणांचे नाव – २४ एप्रिल २०२४ –२४ एप्रिल २०२५
गोसीखुर्द –९.४७, –५.६७,
तोतलाडोह –२०.४६, – २०.७४,
ऊर्ध्व वर्धा –९.९७ – ९.६४.
जायकवाडी –८.८७ –३३.५१
मांजरा – ०.२८ – २.०३
हतनूर –४.५१ – ४.५१
गंगापूर – २.४८ – ३.०७
कोयना – ३५.९८ – ३४. १४
खडकवासला – १.०६ – ०.९६
भातसा – १२.९१ – १४.६५
धामणी ‌– ०.०७ – ०.०७.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *