
मुंबई :
राज्यात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर त्याचा फटका ३३ व्या एलआयसी एमसीए कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेलाही बसला. तिसऱ्या फेरीतील आठपैकी सहा सामन्यांचा रविवारचा खेळ रद्द करावा लागला. मात्र विरारच्या अवर्स क्रिकेट क्लबच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात आझाद मैदान केंद्राने पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर पालघर-बोईसर केंद्रावर विजय मिळवला.
रविवारी फक्त विरार आणि डहाणूच्या अदानी क्रिकेट मैदानावरील सामने पार पडले. पालघर-बोईसर केंद्राला पहिल्या डावात १७२ धावांवर रोखल्यानंतर आझाद मैदान केंद्राने निखिल वर्माच्या नाबाद १३७ धावांच्या खेळीमुळे २११ धावा उभारल्या. निखिलने १३७ चेंडूंत २६ चौकारांची आतषबाजी करत शतकी खेळी साकारली. मात्र अन्य फलंदाजांनी फारशी साथ न दिल्यामुळे आझाद मैदान केंद्राला मोठी धावसंख्या रचता आली नाही. पालघर-बोईसर केंद्राच्या आयुष पाटीलने चार बळी मिळवत आझाद मैदान केंद्राच्या फलंदाजांना वेसण घातली. त्यानंतर पालघर-बोईसर केंद्राला दुसऱ्या डावात ३३ षटकांत ८ बाद १०८ धावा करता आल्या. पण पहिल्या डावातील ३९ धावांच्या आघाडीच्या बळावर आझाद मैदान केंद्राला विजयी घोषित करण्यात आले.
डहाणू येथे विरार केंद्र आणि मालाड केंद्र यांच्यात दुसऱ्या दिवसाचा खेळ रंगला. मात्र पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे होऊ शकला नव्हता. दुसऱ्या दिवशी विरार केंद्राने ३८ षटकांत २ बाद ९८ धावा केल्या. मात्र हा सामना अनिर्णीत राखण्यात आला.
- संक्षिप्त धावफळ
- गट अ
एमसीए अकादमी केंद्र (२): सर्वबाद १९७ (प्रणव अय्यंगार ५८, श्लोक माळी ४३, पार्थ माळी ३६, हृदान ठक्कर ४/३७, अतिश लाल ३/४०) विरुद्ध माटुंगा केंद्र २८-२ सामना अनिर्णीत
कल्याण केंद्रः सर्वबाद 139 (अमोघ पाटील ५०, विजय पाल ५/१९ विरुद्ध भिवंडी आणि वांगणी केंद्र: १००/२ (यश म्हात्रे ४१*, इशान पाठक ३८.) सामना अनिर्णीत
- गट ब
पालघर आणि बोईसर केंद्र : सर्वबाद 172 (अरहान पटेल ४५, मानव केणी ४५, विधिराज शुक्ला ३२, निखिल गुरव ३/४७, युवान शर्मा ३/४३, निखिल वर्मा
३/२३) आणि ११८/०८ ( अरहान पटेल ६५, युवान शर्मा ६/१९ ) पहिल्या डावावर पराभूत विरुद्ध
आझाद मैदान केंद्र : सर्वबाद २११ ( निखिल वर्मा १३७*, आयुष्य पाटील ४/४४)
वाशी केंद्र : सर्वबाद १२५ (यशराज काळसकर ५८, कविश गोसालिया ४/३९, धैर्य म्हात्रे ४/२४) विरुद्ध एमसीए अकादमी केंद्र (१): ११२/२ ( प्रितिश बेंगानी ६५*) सामना अनिर्णीत
- गट क
कांदिवली केंद्र : २५८/५ (युग असोपा १२१*, अद्वैत भट ३०) विरुद्ध कलिना केंद्र सामना अनिर्णीत
विरार केंद्र (१) : ९८/२ विरुद्ध मालाड केंद्र सामना अनिर्णीत
- गट ड
घाटकोपर केंद्र : सर्वबाद ७७ (अक्षित सिन्हा ५/२२) पहिल्या डावावर पराभूत विरुद्ध ठाणे केंद्र (१) : सर्वबाद १०० ( विवान जोबनपुत्र ४/२१, सोहम सोनवणे ३/७)
विरार केंद्र (२) : सर्वबाद ३०१ ( शाहीद खान १०९, सैफाली ४९, शिवा सिंग ३१, युवराज पाटील ३०, आयुष चव्हाण ३/३२ विरुद्ध ठाणे केंद्र(२) : ५०/३