
मंबई :
ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टी भागामध्ये आज हवामान विभागाकडून उच्च लाटांचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे समुदामध्ये लहान बोटींना न जाण्याचा तसेच पर्यटन व जलक्रीडा पूर्णतः थांबवण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टी भागामध्ये गुरुवारी सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांपासून शुक्रवारी रात्री ११.३० वाजेपर्यंत ३.५ ते ३.८ मीटर उंच लाटा येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे या दरम्यान समुदामध्ये लहान बोटींना न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे किनारपट्टीजवळील पर्यटन व जलक्रीडा पूर्णतः थांबवण्याचाही इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली. त्यामुळे ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टी भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.