
मुंबई :
भारतीय रेल्वेने दीर्घ कालावधीनंतर लांब पल्ल्याच्या मेल एक्स्प्रेस गाड्यांच्या प्रवासी भाड्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अमलबजावणी १ जुलैपासून होणार असल्याचे वृत्त आहे. तर उपनगरीय लोकल दरात कोणतीही वाढ करण्यात आली नसल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
भारतीय रेल्वेने १ जुलै २०२५ पासून प्रवासी भाड्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ मुख्यतः लांब पल्ल्याच्या प्रवासावर लागू होईल. तर उपनगरीय आणि मासिक पासच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच ५०० किलोमीटरपर्यंतच्या सेकंड क्लास प्रवासासाठीही भाडेवाढ लागू होणार नाही.
भाडेवाढीचा निर्णयानुसार नॉन-एसी मेल एक्स्प्रेस गाड्यांच्या भाड्यामध्ये प्रति किलोमीटर १ पैशांची वाढ होणार आहे. तर एसी क्लासच्या तिकीटामध्ये प्रति किलोमीटर २ पैशांची वाढ होईल. तर सेकंड क्लासची भाडेवाढ ५०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी प्रति किलोमीटर ०.५० पैशांची करण्यात आली आहे. तर उपनगरीय रेल्वे आणि मासिक पासच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. उपनगरीय लोकलच्या दरात वाढ केली नसल्याने मुंबईकरांना दिलासा देण्यात आला असला तरी मेल एक्स्प्रेसच्या नॉन एसी आणि एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला भुर्दंड बसणार आहे.