शिक्षण

अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील परीक्षा मुंबई विद्यापीठाने पुढे ढकलल्या

महाड :

रायगड जिल्ह्यामध्ये २४ जुलैच्या रात्रीपासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे कुंडलिका, अंबा व सावित्री या नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. तसेच प्रादेशिक हवामान विभागाने २५ जुलै २०२४ रोजी सकाळी ७ वाजता जारी करण्यात आलेल्या चेतावणीनुसार रायगडमध्ये अतिवृष्टी (Heavy to very Heavy Rainfall at to places with extremely heavy rainfall at Isolated places) रेड अलर्टचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनूसार २४ जुलै २०२४ रोजी रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा (Heavy to very Heavy Rainfall at to places with extremely heavy rainfall at Isolated places) रेड अलर्टचा इशारा दिला होता. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, माणगाव, तळा, रोहा, सुधागड-पाली या तालुक्यांमध्ये २४ जुलैच्या रात्रीपासून अतिवृष्टी झाली आहे. तसेच समुद्रास असलेल्या भरतीमुळे कुंडलिका, अंबा व सावित्री या नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी भरले आहे. तसेच २५ जुलै रोजी सुद्धा रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने २५ जुलै २०२४ रोजी सकाळी ७ दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पूरस्थिती लक्षात घेत जाहीर झालेल्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थीहित लक्षात घेता व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठाने २५ जुलै २०२४ रोजी सकाळी आणि दुपारच्या सत्रात होणाऱ्या महाड, पोलादपूर, माणगाव, तळा, रोहा, सुधागड-पाली या तालुक्यातील सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौदळे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *