शहर

कोकणात जाणाऱ्या सर्व एक्स्प्रेस गाड्यांना भांडुप स्थानकात थांबा द्यावा – खा. संजय पाटील

मुंबई : 

मुंबईत भांडुप ते विक्रोळीदरम्यान लाखो कोकणवासी राहतात. त्यांना कोकणात जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा दिवा रेल्वे स्थानकावर जावे लागते. याचा सर्वाधिक त्रास महिला, लहान मुले व वृद्ध यांना होतो. यासाठी भांडुप रेल्वे स्थानकात कोकणला जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व गाड्यांना थांबा देण्यात यावा, तसेच दोन्ही प्लॅटफार्मची लांबी वाढविण्यात यावी, अशी मागणी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

खासदार संजय पाटील हे २००९ ते २०१४ या दरम्यान खासदार असताना त्यांनी कोकणात जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व गाड्यांना भांडुप रेल्वे स्थानकात थांबा देण्यात यावा अशी मागणी केली होती. याबाबत रेल्वेच्या महाव्यवस्थापकांबरोबर झालेल्या बैठकीत हा मुद्दा मांडण्यात आला होता. त्यावेळी रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते की सर्वे करुन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. मात्र आजगायत याबाबत काहीच कार्यवाही न झाल्याने खासदार संजय दिना पाटील यांनी हा मुद्दा पुन्हा उपस्थित करीत ही मागणी केली आहे. याचा फायदा मुलुंड, भांडुप, कांजुर, विक्रोळी व घाटकोपर भागात राहणाऱ्या कोकणवासीय प्रवाशांना होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *