शिक्षण

महाडच्या वरंधमधील श्री छत्रपती विद्यालयाचा बारावीचा निकाल लागला शंभर टक्के

मुंबई :

रायगड शिक्षण प्रसारक मंडळाच्या महाडमधील वरंध येथे असलेल्या श्री छत्रपती माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचा दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. या विद्यालयातून परीक्षेला ७८ विद्यार्थी बसले होते. या विद्यालयामध्ये विज्ञान शाखा असून या शाखेतील सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले.

श्री छत्रपती माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील वैष्णवी विजय ढेरे ही ६८.५० टक्के गुण मिळवून प्रथम आली. सृष्टी भाऊ झांजे ही ६५.६७ टक्के गुण मिळवून द्वितीय तर मनाली महेंद्र मोरे ही ६५ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. यावर्षी देखील गुणांच्या बाबतीत मुलींनी बाजी मारली. विज्ञान विषयासाठी सुसज्ज अशी लॅब, ग्रंथालय, मेहनती आणि तज्ज्ञ अशा प्राध्यापकांची मेहनत या सर्व गोष्टींमुळे विद्यालयाची निकालाची परंपरा कायम राहिली आहे. विद्यालयाचे सभापती शहाजी (बापू) देशमुख, विश्वस्त आणि आदर्श ग्रामपंचायत वरंधचे सरपंच जयवंत (तात्या) देशमुख यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक इनामदार व सेवकवृंदांचे विद्यालयात भेट देऊन अभिनंदन केले. तसेच रायगड शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हनुमंत (नानासाहेब) जगताप आणि सर्व विश्वस्त यांनी देखील विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक, सभापतींचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *